नको रुसू लडीवाळा कुठे गेलास निघून,
वाट पाहते हि धरणी रोज अश्रू ढाळून.
कसा धावत यायचा जग कुशीत घ्यायचा.
वाहनार्या वार्यालाही तुझा हेवा वाटायचा.
आनंदाने तुझ्या पाने फुले नाचायची.
धरुनी फांदीला जणू झिम्मा घालायची.
तू नसशील तेव्हा कोण पेलणार भार.
नको हिरे माणके हवी तुझी एक धार.
परत येईन लवकर अस म्हणला जाताना.
गारगार गारा तुझ्यासाठी आणेन येताना.
का फसवतो तू आज तुझ्या लेकरांना.
नको तुझ्या गारा आम्ही भुकेलो थेंबांना.
देतो पैसा म्हणून खोटा पैसा टेकविला.
लेकरांच्या खेळाचा जणू रागच मानला.
खरा पैसा आहे तरी वाट तुझीच पाहतो.
एका एका थेंबासाठी माझा जीवच आटतो
नाही आलास तर काही बोलणार नाही.
झाला उशीर तर कोणी दिसणार नाही.
-कवी शैलेश
sundar........
ReplyDeleteDhanyavaad :)
ReplyDelete