धावत हे मन माझ मला एकदा पकडायचय.
कुठे नक्की चाललं आहे हे एकदा पुसायचंय.
वाटेवरी असे विसावा हे एकदा दाखवायचय.
धावण्याला या अंत नसावा हे एकदा सांगायचय.
रोजच्या शिळ्या जीवनातले नवेपण शोधायचं.
आनंदाच्या एक क्षणाला मला मोहरून जायचंय.
इतरांना मी रोज भेटतो स्वतःला एकदा भेटायचंय.
स्वतःशीच बोलता बोलता अंतर्मुख होऊन जायचय.
रटाळलेल्या वाटा जुन्या मला सोडून जायचंय.
आनंदामागे धावण्यापेक्षा आनंद घेऊन जगायचंय..
- कवी शैलेश
